शिवथर घळ (Shivathar Ghal )

समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ जेथे लिहिला ते एक निवांत आणि निसर्गरम्य स्थळ म्हणजे शिवथरघळ. शिवथरघळीतच रामदासांनी दासबोधसारख्या पवित्र ग्रंथाची निर्मिती केली. शिवथरघळ हे महाडच्या पूर्वेस 34 किमी अंतरावर आहे. घनदाट वनश्री, डोंगर माथ्यावरुन वाहणारे झरे तेथील सुंदर मठ ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. सर्व बाजूंनी उंच पर्वत आहेत. वाघजाई दरीच्या कुशीत हे रमणिय ठिकाण आहे. भगवान श्रीधरस्वामी आणि समर्थ रामदास यांच्या मूर्ती येथे आहेत.

Add new comment