उंबरखिंड ( Umbarkhind )
खोपोलीहून पालीकडे जाणा-या रस्त्याला खोपोलीपासून १०-१२ किलोमीटर गेल्यावर डाव्या हाताला ‘समरभूमी उंबरिखडीकडे’ असा फलक दिसतो. तिकडे वळून अंबा नदीच्या पश्चिम बाजूकडून जाणा-या रस्त्याने जात राहावे. उजव्या हातास नदीपात्रात उतरणारा रस्ता दिसतो व रस्त्याच्या तोंडालाच लढाईची थोडक्यात माहिती देणारा फलक दिसतो.
पुणे-रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर आणि सह्याद्रीच्या कुशीत दडलेली ही ‘उंबरिखड’. शिवाजी महाराजांच्या प्रगल्भ युद्धतंत्राची झलक दाखवणारी व इतिहासाचं भावविश्व उलगडून मंत्रमुग्ध करणारी, उंबरिखडीची इतिहासात आगळीवेगळी ओळख आहे. इथे गेल्यावर या स्मारकाकडे पाहिल्यावर अंगात वीज चमकून जाते. उभा राहतो तो इतिहास ३००-३५० वर्षापूर्वीचा. उभा राहतो तो गरूडासारखा भिरभिरणारा सेनापती नेताजी पालकर आणि मराठयांची अजिंक्य सेना.
नदीपात्रात खडकाच्या सपाटीवर अतिशय समर्पक व सुंदर शिल्प उभारलेले आहे. उत्तरेस महाराजांची अश्वारूढ प्रतिमा कोरलेली आहे. पूर्वेस मुद्रा आहे व लढाईचे थोडक्यात वर्णन आहे. शिल्प चौकोनी चौथ-यावर उभे आहे. पूर्णाकृती धनुष्य, ढाल, तलवार व भाला या सर्व शस्त्रांचा वापर करून अतिशय देखणे व प्रसंगाला अनुरूप असे शिल्प बनवले आहे. उंबरखिंड स्मारक हे गावकरी आणि एक दुर्गप्रेमी/शिवप्रेमी संघटना यांनी संयुक्त विद्यमाने उभारलेले आहे.
उंबरखिंडीचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी तिची भौगोलिक रचना जाणून घेणे महत्त्वाचे आहे. घाटावरून कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटवाटा आहेत. त्यातील एक कुरवंडे घाट. हा घाट लोणावळ्यापासून कोकणातील उंबरे गावापर्यंत जातो. लोणावळ्याकडून येताना सह्याद्रीचा खडा पहाड उतरून आपण चावणी गावापाशी येतो. इथे आपल्याला अंबा नदी भेटते. ही नदी ठाकूरवाडीपर्यंत आपली सोबत करते.
चावणी ते ठाकूरवाडीदरम्यान अंबा नदीच्या पात्राच्या बाजूने जाणारी चिंचोळी पायवाट दाट जंगलातून जाते. या वाटेच्या दोन्ही बाजूला टेकडय़ा आहेत. त्यामुळे या मार्गाची रचना नळीसारखी आहे. या नळीचे बूच म्हणजे ठाकूरवाडीची टेकडी. या टेकडीखालीच अंबा नदी उजवीकडे वळण घेते. या नळीत एकदा शिरले की, मागील खडा सह्याद्री, बाजूच्या टेकडय़ा व अंबा नदीचे पात्र व पुढील ठाकूरवाडीच्या टेकडीचे बूच यामुळे शत्रू आपसुकच कोंडला जातो. या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन महाराजांनी मोघलांच्या बलाढय़ सन्याचा कमीत कमी सन्याने व कमीत कमी वेळात सपशेल पराभव केला.
पुणे-रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर आणि सह्याद्रीच्या कुशीत दडलेली ही ‘उंबरिखड’. शिवाजी महाराजांच्या प्रगल्भ युद्धतंत्राची झलक दाखवणारी व इतिहासाचं भावविश्व उलगडून मंत्रमुग्ध करणारी, उंबरखिंडीची इतिहासात आगळीवेगळी ओळख आहे.
इ.स. १६६१च्या जानेवारीत शाहिस्तेखानाने कारतलबखानाला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकण काबीज करण्याच्या मोहिमेवर पाठवले. कारतलबखानाबरोबर, कछप, जसवंत कोकाटे, जाधवराव हे सरदार व रायबाघन ही स्त्री सरदार होती. याशिवाय पायदळ व घोडदळ अंदाजे २०,००० घोडे, बैल, छोटय़ा तोफा, बंदुका, डेरे, हत्ती, खजिना असा मोगली सरंजाम होता.
खान पुणे, तळेगाव-वडगाव-मळवली माग्रे लोणावळ्याकडे सरकला. वास्तविक पाहता वाटेवरील लोहगड, विसापूर किल्ले स्वराज्यात होते, पण महाराजांच्या आज्ञेमुळे या किल्ल्यावरून खानाच्या सन्याला कोणताच विरोध झाला नाही. कारण उंबरखिंडीत खानाला कोंडीत पकडून झोडपून काढणे शक्य होते. महाराजांनी नेताजीला खानाच्या वाटेवरील पाणवठयांची, विहिरींची कोंडी करण्याचा हुकूम दिला. त्यामुळे खानाची फौज तहानेने हैराण झाली.
खानाला उंबरखिंडीत खेचून आणण्यासाठी महाराजांनी पेणजवळ सन्याची जमवाजमव केली व ही खबर खानापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. खानाने कुरवंडा घाटाने उतरण्याचा निर्णय घेतला व खानाची फौज तो दुष्कर घाट उतरू लागली. फौज दुपापर्यंत कशीबशी चालत चावणी गावात आली.
जानेवारी महिना असल्यामुळे अंबा नदीला पाणी नव्हते. आधीच तहानलेली फौज दुपारच्या उन्हाने व घाट उतरल्यामुळे गलितमात्र झाली होती. अशा वेळी खानाने सन्याला पुढे जाण्याची आज्ञा केली. खानाचे सन्य उंबरखिंडीच्या नळीत गाभ्यात शिरले. सन्याचे पुढचे टोक ठाकूरवाडीच्या टेकडीजवळ व मागील टोक चावणी गावात अशी अवस्था असताना महाराजांच्या सन्याने अचानक मोघली सन्यावर हल्ला केला.
बाजूच्या टेकडयांमुळे व घनदाट अरण्यामुळे मराठयांना नसर्गिक संरक्षण मिळत होतं. पण खानाची फौज वेगाने कापली, मारली जात होती. त्यांना हल्ला कुठून होतोय आहे तेच कळत नव्हते. त्यातच शिवाजी महाराज स्वत: ठाकूरवाडीच्या टेकडीवर सन्य घेऊन उभे आहेत, म्हटल्यावर मोघलांचा धीर खचला.
मागे सह्याद्रीचा खडा पहाड चढणे शक्य नव्हते, तो रस्ता नेताजीच्या सन्याने बंद केला होता. अशा परिस्थितीत शरण जाण्याशिवाय खानाला पर्यायच नव्हता. त्याने महाराजांकडे अभयदान मागण्यासाठी वकील पाठवला. महाराजांनी खानाला सर्व साहित्य आहे तसेच सोडून जाण्याचा हुकूम दिला. खानाचे सन्य रिकाम्या हातांनी परत पुण्याकडे गेले. उंबरखिंडीत २ फेब्रुवारी १६६१ रोजी खानाचा सपशेल पराभव झाला. मोगलांचे घोडे, हत्ती, खजिना, डेरे, शस्त्रे हे साहित्य मराठयांना मिळाले.
छत्रपती शिवरायांनी केवळ आठशे मावळ्यांच्या मदतीने मोगल सरदार कारतलबखानाच्या हजारांच्या फौजेवर चावणी येथील उंबरखिंडीत गनिमीकाव्याने मारा करीत विजय मिळवला. ती समरभूमी शौर्यतीर्थ व्हावी. इथे गेल्यावर या स्मारकाकडे पाहिल्यावर अंगात वीज चमकून जाते. उभा राहतो तो इतिहास ३००-३५० वर्षापूर्वीचा. उभा राहतो तो गरूडासारखा भिरभिरणारा सेनापती नेताजी पालकर आणि मराठयांची अजिंक्य सेना. मुजरा त्या प्रत्येक अनाम वीराला ज्याने स्वराज्य राखण्यासाठी आपल्या रक्ताचा अभिषेक केला.







Add new comment